आजच्या १८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ४२ हजार २५८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २३ हजार ३४० इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ४३२ इतका आहे. तर, पुण्यात एकूण १६ हजार ९५५ इतके रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या १३ हजार ५७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ०२३ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ७७२ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ५६३ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये ३ हजार ९८७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये २ हजार ०७९, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ०२२ इतकी आहे. जळगावमध्ये १ हजार ७३६, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ३३९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ७४९ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या मुंबईत आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १२७ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
६,५८,८६३ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९८ लाख ८६ हजार ५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ८७ हजार ५२१ (१५.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ५८ हजार ८६३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार १९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times