वाचा:
रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांसह माजी खासदार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘सुमारे ८ वर्षांपूर्वी नवनीत राणा यांनी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात सातत्यानं तक्रारी केल्या. अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडं तक्रार केली. तिथं नवनीत राणा जिंकल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्थापन झालेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे २०१३ साली तक्रार केली. तिथंही नवनीत जिंकल्या. ह्या सगळ्या निर्णयानंतरही हायकोर्टानं दिलेला जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं योग्य न्याय देत अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती दिली. त्यामुळं आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे,’ असं राणा म्हणाले. आता आम्ही स्वातंत्र्यापूर्वीपासूनची जवळपास २०० हून अधिक कागदपत्रे न्यायालयात सादर करणार आहोत. जेणेकरून ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होऊन जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना रवी राणा म्हणाले, ‘मुख्यमंत्री स्वत: अॅड. अनिल परब यांच्या माध्यमातून नवनीत राणा यांना टार्गेट करत आहेत. ते द्वेषाचं राजकारण करत आहेत. मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्या विदेशातील बेकायदा संपत्तीची, जमिनींची व घरांची माहिती घेतली आहे. ही सर्व माहिती ईडी आणि सीबीआयला देणार आहे व तातडीनं कारवाईची मागणी करणार आहे,’ असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्याशिवाय, अनिल परब यांनी अलीकडंच एका बेकायदा रिसॉर्टचं बांधकाम केलंय. स्वत:च्या नावावर ते करून घेतलंय. याचीही माहिती मी घेतली असून त्याविषयी देखील तक्रार करणार आहे,’ असा इशारा राणा यांनी दिला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times