‘पेटीएम अपडेट न केल्यास तुमचे अकाउंट होईल, असा मेसेज सायबर चोरट्यांकडून नागरिकांना पाठविला जात आहे. त्यामुळे अनेकांकडून पेटीएम बंद होऊ नये, यासाठी पेटीएम अपडेट करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानुसार सायबर चोरट्यांकडून पेटीएमधारकांना गोपनीय माहिती विचारुन लाखोंचा गंडा घातला जात आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. पेटीएम कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा मेसेज पाठविण्यात आलेला नाही. असे असतानाही अनेकांची पेटीएम अकाउंट अपडेटच्या नावाखाली आर्थिंक लूट केली जात आहे. त्यामध्ये बहुतांश सुशिक्षितांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.
असा घातला जातोय गंडा
सायबर चोरट्यांकडून नागरिकांना मेजेस पाठवून पेटीएम अपडेट करण्यास सांगितले जात आहे. २४ तासांच्या आतमध्ये पेटीएम अपडेट केले नाही तर तुमचे खाते बंद करण्यात येईल, असे सांगून घाबरविले जाते. त्यामुळे अनेकजण पेटीएम अकाउंट अपडेट करण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर फोन करतात. त्यावेळी सायबर चोरट्यांकडून पेटीएमची गोपनीय माहिती विचारुन ऑनलाइनरित्या रक्कम काढून घेतली जात आहे. एनीडेस्क, टीम व्हिवर, क्वीक सपोर्ट यांसारखे अॅप डाउनलोड करण्यास सांगून यूपीआय पीनसह एटीएम आणि क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती विचारुन गंडा घातला जात आहे.
पेटीएम अपडेटच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी अनेकांना गंडा घातला आहे. या फसवणुकीमध्ये सर्वाधिक सुशिक्षित नागरिक आहेत. नागरिकांनी पेटीएम अपडेट करण्यास सांगून गोपनीय माहिती विचारुन लुट केली जात आहे. पेटीएम कंपनीकडून अपडेटसंदर्भात कोणालाही मेसेज पाठविले जात नाही. नागरिकांनी मेसेजला उत्तर न देता खात्याची गोपणीय माहिती त्यांना देऊ नये. तसेच, त्यांची सायबर पोलिस ठाण्याकडे तक्रार नोंदवावी.- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक सायबर पोलिस ठाणे
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times