खरंतर, अनेकदा निवेदने देऊनही दखल न घेतल्याने काही महिला अमरावती येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषनाला बसल्या होत्या. त्यामुळे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या उपोषणाला भेट देत त्यांच्या मागण्या समजून घेत त्यांना पाठींबा दिला. तर बच्चू कडू यांच्या आश्वासनानंतर महिलांनी उपोषण मागे घेतले.
दरम्यान, सरकार काय करेल हा नंतरचा भाग आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची समस्या ही राज्यातील प्रकल्पग्रस्तांची असून ती सरकारकडे ठेऊन त्या मार्गी लागतील. यासाठी प्रयत्न करू आणि घरे बांधण्यासाठी 2 ते 2.50 लाख रुपयांची मदत मिळेल असं जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या या शब्दावर आता सरकार कधी मदत करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times