शुक्रवारी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळंच नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आलं असल्याची चर्चा आहे. तसंच, पावसाळी अधिवेशन ५ जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाहीये. त्यापार्श्वभूमीवप पटोलेंना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावल्याचे समजतंय.
नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पटोलेंकडे उर्जा खात्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. नितीन राऊत यांच्याकडे असलेले उर्जा खाते नाना पटोलेंना मिळणार असल्याचीही चर्चा होती. त्यामुळं उद्या होणाऱ्या बैठकीत याबाबत काही निर्णय होणार का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचाः
गेल्या काहीदिवसांपासून राजकारणात भेटीगाठी व चर्चेचे सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्र मंच’ने ही बैठक बोलावली होती. आठ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं बोललं जात आहे. पण त्यात काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळं चर्चेला अधिक उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवरच शुक्रवारची होत असल्याचं बोललं जात आहे.
वाचाः
स्वबळाचा मुद्दा?
नाना पटोले यांनी आगामी निवडणुकाची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीदेखील काँग्रेसचे कान टोचले होते. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं स्वबळाच्या मुद्द्यावर हायकंमाडसोबत चर्चा होणार का अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times