मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाज सध्या आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेलं मूक आंदोलन सरकारनं काही मागण्या मान्य केल्यानंतर स्थगित करण्यात आलं आहे. मात्र, काही संघटनांनी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. शिवसंग्राम संघटनेनं २६ जून रोजी श्रीहरी पविलियन येथे लढा आरक्षणाचा संघर्ष मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आज येथे आज सकाळी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक उधळण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला.
वाचा:
बैठकीनंतर मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ‘बैठक सुरू असताना सरकारी पक्षाच्या काही तडीपार गावगुंडांनी तिथं गुंडगिरी केली. मारामारी केली. दोघा-तिघांनी त्यांच्या लोकांना बोलावून गोंधळ घातला. हा हल्ला पूर्वनियोजित होता. सरकारला मराठा समाजाचे प्रश्न सोडवता येत नाही, आरक्षण देता येत नाही, आंदोलन करू द्यायचं नाही, अधिवेशनात प्रश्न मांडू द्यायचा नाही, मराठा समाजाचा आवाज दाबण्यासाठी ठाकरे सरकार गुंडांचा वापर करत आहे, मात्र मराठा समाज कोणालाही घाबरला आणि घाबरणार नाही. आम्ही सगळ्यांना पुरून उरू. सरकारच्या नाकावर टिच्चून मेळावा घेतल्याशिवाय राहणार नाही, असं मेटे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रारही दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलं.
संभाजीराजेंच्या भूमिकेबद्दल मेटे म्हणाले…
‘मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी काय करावं ते मी सांगू शकत नाही. ते त्यांच्या परीनं आंदोलन करत आहेत, मी माझ्या परीनं आंदोलन करत आहे. आतापर्यंत मराठा समाजाची एक तरी मागणी मान्य झाली आहे का? झाली असेल तर ते कागदोपत्री दाखवा. मराठा समाजाची एकही मागणी मान्य झालेली नाही. कोविडच्या नावाने सर्व प्रश्न प्रलंबित राहिले आहेत,’ असं मेटे म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times