भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी ट्विट करत हा सल्ला दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या लिंक दिल्या आहेत. ही भाषणे ऐकल्यास दोन फायदे होणार असून एक तर डोक्यात प्रकाश पडेल आणि दुसरे म्हणजे आरक्षणाचा प्रश्न सोडवणे सोपे होईल, असा टोला उपाध्ये यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप रस्त्यावरची लढाई लढत आहे. तर, महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांची खिल्ली उडवत उपाध्ये यांनी फडणवीस यांचे भाषण ऐकण्याचा सल्ला दिला आहे.
उपाध्ये आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू आहेत. केंद्राकडे बोट दाखवतात, तर प्रवक्ते हे काही पत्रांकडे बोट दाखवतात. अहो, पण एसईसीसीचा डेटा हा ५० टक्क्यांच्या आतल्या आरक्षणासाठी नाही, तर वरचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी ती माहिती मागण्यात आली.’
क्लिक करा आणि वाचा-
पुढच्याच ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात, ‘पण, २०१३ साली त्यावेळच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने एक आदेश काढला होता की, ही माहिती राज्यांना देऊ नका. कारण, हा संपूर्ण डेटा चुकीचा आहे. तो राज्यांना दिला तर अनेक गंभीर आणि नवीन प्रश्न निर्माण होतील.’
इतके सांगूनही जर हा विषय समजला नसेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी खाली दिलेल्या दोन लिंक ऐकाव्या. त्यांने दोन फायदे होतील असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. ते म्हणतात, ‘ …आणि अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका. त्याने २ फायदे होतील. १. डोक्यात प्रकाश पडेल
२. आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल.’
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times