म्युनिच सुरक्षा अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावाचे आहेत. एखाद्या दहशतवादी हल्ल्यामुळेदेखील या देशांमध्ये युद्ध होऊ शकते. भारत-पाकमध्ये आण्विक युद्ध झाल्यास १०० ते १५० अणवस्त्रांचा वापर होऊ शकतो. त्यामुळे १६ ते ३६ टनपर्यंत कार्बनयुक्त काळ्या धुराचे साम्राज्य आकाशात पसरण्याचा धोका या अहवालात मांडण्यात आला आहे.
वाचा:
या अणूयुद्धामुळे पृथ्वीच्या तापमानात २ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत घट होईल. तर, सुर्याचा प्रकाश २० ते ३५ टक्क्यांनी कमी होईल. त्याशिवाय, जमिनीची सुपिकता १५ ते ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. याच्या परिणामी २०२५ मध्ये १२ कोटी नागरिकांचा मृत्यू होणार असल्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मागील वर्षी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times