मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ४८९ नव्या बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज एकूण ८ हजार ३९५ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १५३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या १५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ४५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के एवढे झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ५७५ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात हा आकडा १७ हजार १०६ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाण्यात एकूण १६ हजार ६३० इतके रुग्ण आहेत. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १२ हजार ८२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ०८७ इतकी आहे. सांगलीत ही संख्या १० हजार ५२८, साताऱ्यात ही संख्या ८ हजार २५५, रत्नागिरीत ५ हजार ५३७, रायगडमध्ये ४ हजार ९४५, सिंधुदुर्गात ४ हजार २७४, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ००९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४५५ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

यवतमाळमध्ये फक्त ५० सक्रिय रुग्ण

या बरोबरच अहमदनगरमध्ये २ हजार ८६४ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ०६९, नांदेडमध्ये ही संख्या ५०४ इतकी आहे. जळगावमध्ये ८३८, तसेच अमरावतीत ही संख्या ३३८ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ५० इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

६,३२,९४९ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी २३ लाख २० हजार ८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ८८ हजार ८४१ (१४.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३२ हजार ९४९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार ४२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here