श्रीलंकेत पोहोचण्याआधी भारतीय संघ मुंबईत १४ दिवस क्वारंटाइन होता. त्यानंतर लंकेत पोहोचल्यानंतर देखील ते तीन दिवस क्वारंटाइनमध्ये होते. आता भारतीय खेळाडूंनी राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने () याचा व्हिडिओ शेअर केलाय.
भारतीय संघातील खेळाडू १७ दिवस क्वारंटाइमध्ये होते आता बाहेर येऊन एकमेकांना भेटत आहेत. १७-१८ दिवसांपासून आम्ही क्वारंटाइनमध्ये होतो. खेळाडूंना आता खुप छान वाटत आहे. थोडे हसण्या खेळण्याची संधी मिळत आहे, असे द्रविडने सांगितले.
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये आहे. अशा वेळी बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठी दुसरा संघ पाठवला आहे. या दौऱ्यात शिखर धवनकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविडवर देण्यात आली आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच मोठी मालिका खेळत आहे. कोच म्हणून राहुल द्रविडची निवड झाल्यामुळे भारतीय खेळाडूच नाही तर चाहते देखील खुश झाले आहेत.
श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-२० वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघासाठी ही शेवटीच मालिका आहे.
एका बाजूला चाहते या मालिकेची वाट पाहत असताना श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने भारताने दुय्यम दर्जाचा संघ पाठवून अपमान केल्याची टीका केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times