नवी दिल्ली : दिल्लीचा क्रिकेटर असलेल्या सुबोध भाटीने टी-२० सामन्यात ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल, असा नवा इतिहास घडवला आहे. सुबोध भाटीने टी-२० सामन्यात दुहेरी शतक ठोकून सर्वांना चकित केले आहे. दिल्ली इलेव्हनचा खेळाडू असलेल्या सुबोध भाटीने टी-२० क्लब मॅचमध्ये सिम्बाविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला. दिल्ली इलेव्हनच्या डावाची धुमधडाक्यात सुरवात करत त्याने मैदान दणाणून सोडले.

वाचा-

सुबोधने ७९ चेंडूत नाबाद २०५ धावांची धुवाधार खेळी साकारली. त्याने आपल्या खेळीमध्ये १७ षटकार आणि १७ चौकारांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याच्या खेळीच्या बळावर दिल्ली इलेव्हनने २० षटकात २६५ धावांचा डोंगर उभारला. टी-२० प्रकारात दुहेरी शतक ठोकणारा सुबोध पहिला खेळाडू ठरला आहे. उजव्या हाताचा खेळाडू असलेला सुबोधने २०१५-१६ देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्यास सुरवात केली. पण दिल्लीकडून तो कायमस्वरुपी खेळू शकला नाही. पण आजच्या खेळीनंतर तो दिल्ली संघात ते स्थान मिळवेल, अशी आशा आहे.

वाचा-

भारतातील डोमेस्टीक क्रिकेटला लवकरच सुरवात होईल. बीसीसीआयने शुक्रवारी त्याची घोषणा केली. भारतातील स्पर्धांचा हंगाम २१ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होईल. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २० ऑक्टोबरपासून सुरू होऊन त्याचा अंतिम सामना १२ नोव्हेंबरला होणार आहे. तर १६ नोव्हेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान रणजीचा थरार रंगणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२२ दरम्यान विजय हजारे ट्रॉफी खेळली जाईल. पुरुष आणि महिला गटात एकूण २१२७ घरगुती सामने खेळविण्यात येणार आहेत.

वाचा-

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here