खातेवाटपात मोठे बदल दिसून येत आहे. पियुष गोयल यांच्याकडील वाणिज्य मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडे वस्त्रोद्योग आणि ग्राहक कल्याण मंत्रालयाचा अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्री करण्यात आले आहे. यासोबतच माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क या खात्याचीही जबाबदारी दिली गेली आहे.
धर्मेंद्र प्रधान हे नवे शिक्षणमंत्री असतील. स्मृती इराणींना महिला आणि बाल विकास खातं दिलं गेलं आहे. यासोबत त्या स्वच्छ भारत मोहीमेचे कामही पाहतील.
मनसुख मांडवीय यांना आरोग्यमंत्री करण्यात आलं आहे. यासोबतच त्यांना खते आणि रसायन मंत्रीपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. हरदीप सिंग पुरी यांना आरोग्य मंत्रालय आणि खते आणि रसायन, नगरविकास, गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अनुराग ठाकूर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी दिली गेली आहे. तर ज्योतिरादित्य शिंदे यांना नागरी हवाई वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. पुरुषोत्तम रुपाला यांना दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्रालय देण्यात आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times