आजच्या १४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ८१ हजार १६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०५ टक्के एवढे झाले आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाण्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार ६२५ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १७ हजार ७०८ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १६ हजार ६५७ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या १२ हजार ९०२ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १२ हजार २५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या १० हजार ६५७, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ६७५, रत्नागिरीत ५ हजार ०१२, रायगडमध्ये ४ हजार ५७४, सिंधुदुर्गात ३ हजार २५८, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार ५३५ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३१९ इतकी आहे.
यवतमाळमध्ये फक्त २७ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, अहमदनगरमध्ये ३ हजार २६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये ९९३, नांदेडमध्ये ही संख्या ५०२ इतकी आहे. जळगावमध्ये ७८८, तसेच अमरावतीत ही संख्या ३०९ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २७ इतकी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times