म. टा. प्रतिनिधी, पुणेः मुंबई बंगळुरू महामार्गावर साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या माल ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या आठ वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ चारचाकी, ३ रिक्षा वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी सकाळी नवले पुल येथे घडली.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताराकडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या माल ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

वाचाः

साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने निघालेला माल ट्रक ( क्रमांक : डी डी ०१ सी ०४६७ ) सकाळी नवले पुल व वडगांव पुल येथील हॉटेल विश्वास समोर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने समोरच असणाऱ्या ४ चारचाकी वाहनांना व ३ रिक्षाला जोरदार धडक दिली, त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. तर ८ गाड्यांचे नुकसान झाले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून जखमींची माहिती घेत आहेत. सकाळी झालेल्या या अपघातामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here