वाचा:
नाना पटोले हे स्वबळावर अधिक आक्रमक झाल्याचे आज पहायला मिळाले. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या संदेशाचा उल्लेख करतच निशाणा साधला. समझोता करायचा नाही आणि सोबत राहून सुरा खुपसायचा असेल तर ते चालणार नाही. याबद्दल जो काही राग आपल्या मनात आहे ती एक ताकद बनली पाहिजे, असे आवाहन पटोले यांनी कार्यकर्त्यांना केले. काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढल्या पाहिजेत या म्हणण्यावर मी ठाम आहे. आता माघार घेणार नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन पटोले यांनी केले.
वाचा:
शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसलाही पटोले यांनी लक्ष्य केले. पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. त्यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे केली जात नाहीत. यात संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं असं आपण म्हणतो पण शेवटी त्यांचं ऐकायचं की नाही हेसुद्धा तेच ठरवतात. कोणत्याही समित्यांवर नावे पाठवायची असतील तर तिथे संपर्कमंत्र्यांची नाही तर पालकमंत्र्यांची सही लागते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपली ताकद कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रीत करा, असे आवाहन पटोले यांनी केले. पटोले यांनी प्रथमच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही लक्ष्य केल्याने महाविकास आघाडीतील तणाव वाढणार हे निश्चित आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times