इंधन दरवाढीचा निषेध करीत अहमदनगरच्या महिला काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनासोबत शेणाऱ्या गोवऱ्याही पाठविण्यात आल्या आहेत. महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हातात गोवऱ्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने केली. त्यानंतर या गोवऱ्या कुरिअरद्वारे दिल्लीला पंतप्रधानांच्या पत्यावर पाठविण्यात आल्या आहेत. (congress party protests against in ahmednager)
अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून शेणाच्या गोवऱ्या कुरिअरने पाठविण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. इंधन दरवाढीच्या विरोधात सध्या काँग्रेसतर्फे विविध आंदोलने सुरू आहेत. अहमदनगरमध्ये सायकल रॅलीनंतर आज गोवऱ्या पाठविण्याचे आंदोलन करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, सुमन काळापहाड, शारदा वाघमारे, उषा भगत, माजी नगरसेविका जरीना पठाण, हेमलता घाटगे, रजनी भोसले, गीता लक्ष्मण, रिजवाना पटेल, कविता लोडगे, मुक्ता डहाळे यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांना गॅस वापरणे परवडणारे नाही. करोना महामारीमुळे आमचे मासिक उत्पन्न घटले आहे. अनेक आप्तेष्टांना, जवळच्यांना आम्ही या महामारीत गमावले आहे. एका बाजूला हे दुःख आणि आर्थिक संकट असताना दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने इंधनाच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे आमच्या महिला वर्गाचे जगणे कठीण झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
२०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मोदी सरकार सत्तेत येऊन जवळपास सात वर्षे उलटली तरी देखील आमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा झालेले नाहीत. तेवढे तात्काळ पाठवून द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times