मेघना वोर्डीकर या भाजप कार्यकर्त्यांसोबत थेट कृषी कार्यालयात पोहीचल्या आणि तेथील अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला. शेतकऱ्यांच्या शेतात गुढग्याएवढं पाणी आहे. मात्र, रिलायन्सकडून साधे पंचनामे ही करण्यात आले नाही. उलट कंपनीकडून देण्यात आलेला टोल फ्री नंबर बंद करण्यात आला आहे.
मागच्यावर्षी जिल्ह्यातून साडे तीनशे कोटींचा पीकविमा भरण्यात आला होता. मात्र, रिलायन्स कंपनीला जिल्ह्यात ऑफिस उघडता आला नाही की साधा बोर्डसुद्धा त्यांनी लावला नाही. यामुळे शेतकरी भरडला जातोय. शेतकऱ्यांनी नेमकी तक्रार दाखल कुठे करायची ? असा प्रश्न शेतकाऱ्यांसमोर आहे. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनांनाही रिलायन्सकडून केराची टोपली दाखवल्याचा आरोप बोर्डीकरांनी यावेळी केला.
यावेळी आक्रमक पवित्रा घेत मेघना यांनी रिलायंससोबत केलेला 3 वर्षाचा करार रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, परभणी शहरात मागील दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार ढगफुटीजन्य पावसामुळे शहरातील धार रोड, वांगी रोड, येलदरकर कॉलनी, संत गाडगेबाबा नगर, लक्ष्मी नगर परसावत नगर अश्या अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढून अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचले होते. यावेळी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी परिसरामध्ये नागरिकांना भेट देऊन नुकसानाची पाहणी करून नागरिकांचे सांत्वन केले होते.
सोबतच जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना भेटून नागरीकांना तात्काळ मदत देण्याची मागणी देखील केली होती. झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या उदरनिर्वाहाची साधनसामुग्री संपूर्ण नाहीशी झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना तात्काळ मदत देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times