अधिक माहितीनुसार, मुंबईशिवाय हवामान खात्यानेही ठाणे आणि रायगड येथे पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, वडाळा, सायन आणि गांधी मार्केटमधील सखल भागात रस्त्यांवर पाणी साचले आहे. दुसरीकडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही बसेसचा मार्ग बदलला आहे तसेच हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेन सेवेवरही परिणाम झाला आहे.
मध्य रेल्वे सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस आणि पाणी साचल्याने गाड्या कुर्ला-विद्याविहारजवळ २०-२५मिनिटांनी उशिराने धावत होत्या. स्लो मार्गावरील वाहतूक कुर्ला-विद्याविहार जलद मार्गाकडे वळविली. हार्बर मार्गावरही २०-२५ मिनिटे उशिराने गाड्या धावत होत्या, त्यामुळे आज मुसळधार पाऊस पडल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
आठवड्यात सामान्यपेक्षा ७७% जास्त पाऊस
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जर दिवसभरात पाऊस वाढला तर नागरिकांना आजही त्रास सहन करावा लागू शकतो. १ जूनपासून मुंबईत एकूण १२९१.८ मिमी पाऊस झाला आहे. हा सामान्यपेक्षा ४८% जास्त आहे. गेल्या आठवड्यात एकट्या मुंबईत ३०२ मिमी इतका पाऊस पडला आहे जो सामान्यपेक्षा ७७% जास्त आहे. शहरातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने जनतेला धरणग्रस्त भागात जाऊ नयेत असे आवाहन केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times