रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, पतीनेच दोन मित्राच्या मदतीने घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्यामुळे ढगेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हिराबाई विजय जाधव (वय २६, रा. ढगेवाडी, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हिराबाई यांचे पती विजय दादा जाधव आणि त्याचे मित्र निलेश बाजीराव फरांदे (रा. आनेवाडी, ता. सातारा) आणि सचिन तात्याबा बरकडे (रा. ढगेवाडी, ता. सातारा) या तिघांनी राहत्या घरात असणाऱ्या लाकडी कपाटातील डबीमध्ये ठेवलेले ४५ हजार रुपयांचे मनी मंगळसूत्र चोरुन नेले.
हा प्रकार दि. ८ जुलै ते दि. १५ जुलै रोजी सायंकाळी पाच या वेळेत घडला आहे. याप्रकरणी हिराबाई यांनी शुक्रवार, दि. १६ रोजी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विजय जाधव, निलेश फरांदे आणि सचिन बरकडे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास सहायक फौजदार बागवान करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times