प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत हे टीकास्त्र सोडले आहे. मुंबईत घडणाऱ्या अशा गोष्टींवर आम्ही बोललो तर आपण म्हणाल की राजकारण करतो, असा टोला लगावतानाच पावसाळा आला की अशा प्रकारे नागरिकांचे हकनाक बळी आणखी किती जाणार आहेत, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांना पावसाने झोडपल्यानंतर घडलेल्या दुर्घटनांमध्ये एकूम २५ जणांचा बळी गेला आहे. यात चेंबूरमध्ये भिंत कोसळून १७ नागरिक ठार झाले, तर आरसीएफ भारत नगर परिसरातही दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला. तसेच विक्रोळी येथेही घर कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “चेंबूरमध्ये भिंत कोसळून,विक्रोळीत घर कोसळल्याने जीवितहानी झाली.काही जखमी झाले. आम्ही बोललो कि राजकारण करतो, असे म्हणाल, परंतु पावसाळा आला कि, असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार आहेत? प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या घटना घडतायत.’
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, दुर्घटनास्थळाला मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भेट दिली. यावेळी उंच डोंगरांवर धोकादायक स्थितीत राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येईल असे आदित्य ठाकरे आणि नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चेंबूर आणि विक्रोळी परिसरातील दु्र्घटनांमध्ये बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत घोषित केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times