२७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव सन २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष २०१८ मध्ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. यंदा हा तलाव आज १८ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
क्लिक करा आणि वाचा- विहार तलावाबाबत महत्त्वाची माहिती
> बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
> या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.
> या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
> या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.
> तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो.
> हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times