मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या (AAHL) ताब्यात गेलं आहे. विमानतळाचा संपूर्ण ताबा मिळताच एएएचएलचे मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याचा निर्णय अदानी समूहानं घेतला आहे. त्यावरून चर्चा सुरू असतानाच मनसेनं ‘अदानी’ला इशारा दिला आहे. ( over Shifting of Head Office)

मनसेचे नेते व माजी आमदार () यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘विमानतळाचं फक्त व्यवस्थापन अदानींकडं गेलय. विमानतळ मुंबईमध्येच आहे. आम्हाला डिवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल…,’ असा इशारा सरदेसाई यांनी दिला आहे.

संकटात असलेल्या जीव्हीकेकडून अदानी समूहानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचा (मिआल) ताबा स्वत:कडं घेतला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील प्रस्तावित ताबाही ‘एएचएल’कडं गेला आहे. विमानतळाची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ”नं मुंबईत मुख्यालय थाटलं होतं. पण खरेदी प्रक्रिया पूर्ण होताच कंपनीनं आपलं मुख्यालय गुजरातमध्ये अहमदाबादला हलवलं आहे. यामुळं मुंबईतून गुजरातकडं जाणाऱ्या उद्योगात आणखी एक भर पडली आहे. सध्या मुंबईसह देशातील इतर सहा विमानतळांचा ताबा अदानी समूहाकडं आहे.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here