रत्नागिरी : गेल्या आठ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा पहायला मिळत आहेत. सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं दुपारनंतर पुन्हा एकदा जोर धरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यातच पावसानं दोन हजार मिलिमीटरच्या सरासरीचा आकडा गाठला आहे. पावसाची तीव्रता आणखी वाढेल असाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

अजून जुलै महिन्याचे १० दिवस बाकी असताना १ जुनपासून आजपर्यंत पावसानं १९३९ मिलिमीटरचा टप्पा गाठला. गेल्या २४ तासात सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात १०२ मिलिमिटर झाला आहे. गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यत १२६५ मिलिमीटर एवढाच पाऊस झाला होता.

आजपासून पुढील दोन दिवस हवामान खात्याने जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. दुपारानंतर पावसाचा दोर आणखी वाढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

– रत्नागिरी जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत १९३९ मिलिमिटर पाऊस

– तालुक्यात तब्बल २२६७ मिलिमिटर पाऊस

– दापोली तालुक्यात सर्वात कमी पाऊस१६२१ मिलिमिटर

– गेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी

– जिल्ह्यात २४ तासात १०२ मिलिमिटर पाऊस

खेड येथील जगबुडी नदीने व राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे नद्यांशेजारील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगबुडी नदीची इशारा पातळी ६ इतकी असून सध्याची पातळी ६.५० इतकी आहे. तर कोदवली नदीची इशारा पातळी ४.९० इतकी असून सध्याची पातली ६.०० इतकी आहे. अशात जर पाऊस आणखी वाढला तर परिसरात पूर येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here