सांगली: महाविकास आघाडी सरकार आणि यांना आपल्या टीकेचे लक्ष करणारे भाजपचे आमदार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पंढरपूरला विठ्ठल पूजेसाठी मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पोहोचले होते. त्यावरून पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, अशा शब्दात पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, असे सांगतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. राज्यातील ठाकरे सरकार हे नाकर्ते सरकार असून या नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. महापालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ आहेत. हे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत. मात्र या कोविड वॉरिअरच्या सुरक्षा हमी अधिकारचे वाटोळे करायला हे सरकार निघाले असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘केंद्राच्या गरीब कल्याण योजनेकडे राज्याचे दुर्लक्ष’
या वेळी पडळकर यांनी राज्य सरकार हे केंद्राच्या गरीब कल्याण योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राज्य सरकारला फक्त अंमलात आणायची आहे. यासाठी लागणारा निधी हा केंद्र सरकारच पुरवत आहे. मात्र तरीही सरकारनं या योजनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
ही योजना अंमलात आणली जावी यासाठी उच्च न्यायालयाने पाच वेळा तंबी दिली आहे. मात्र, तरी देखील ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करताना दिसत आहे. एकीकडे सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली आहे, तर दुसरीकडे हे प्रस्थापितांचे सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसले आहे अशी पडळकर यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here