या भागीदारीमुळे भुवीने आणखी एका सामन्याच्या आठवणी ताज्या केल्या. 2017 च्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान माजी कर्णधार आणि भुवनेश्वरने अशाच प्रकारे भारताला विजय मिळवून दिला होता. याच सामन्याची आठवण सामना संपल्यानंतर भुवीने शेअर केली आहे.
पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये भुवी म्हणाला की, हा सामना 2017मध्ये झालेल्या सामन्याप्रमाणेच होता. आम्हाला शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करायची होती. 2017मध्ये पल्लेकलच्या मैदानात धोनी आणि भुवनेश्वरने आठव्या विकेटसाठी नाबाद 100 धावांची भागीदारी केली होती. 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था 22 षटकात 7 बाद 131 अशी झाली होती. धोनी आणि भुवीने सावध सुरवात करत डाव सावरला आणि शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेला तो सामना जिंकला. एकेकाळी श्रीलंकेच्या हातात गेलेला हा सामना धोनी आणि भुवनेश्वरने खेचून आणला होता. त्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा भुवनेश्वर हिरो ठरला होता.
चार वर्षांनंतर श्रीलंका दौर्यावर असताना भारतीय संघाने इतिहासाची पुनरावृत्ती केली. फक्त यावेळी भुवीच्या सोबत दीपक चाहर होता. हा सामना जिंकण्यासाठी खेळायचा असं आम्ही विचार करण्यास सुरवात केली नव्हती. पण शेवटपर्यंत खेळत राहायचं आणि वन बॉल अॅट अ टाइम ही रणनीती वापरायचं ठरवलं. दीपक चाहरने रनरेट सहाच्या वर जाऊ दिलं नाही. तो त्याचे शॉट्स खेळत होता.
चाहर आणि भुवीने आठव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. ही दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली. चाहरने 82 चेंडूत 69 तर भुवीने 28 चेंडूत 19 धावा केल्या. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. याच मैदानावर मालिकेचा शेवटचा सामना 23 जुलै रोजी खेळला जाणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times