सोनभद्र, उत्तर प्रदेश: सोन्याच्या खाणींमुळे उत्तर प्रदेशातील सोनभद्र सध्या चर्चेत आहे. पण खाणीत ३००० टन नव्हे तर फक्त १६० किलो सोने आहे, असा दावा भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) केला आहे. ‘सोनभद्रच्या खाणीत ३ हजार टन सोनं असण्यावर जीएसआयचा विश्वास नाही. सोनभद्रमध्ये ५२८०६.२५ टन अशुद्ध सोनं आहे. यातील प्रत्येक टनातून ३.०३ ग्रॅम शुद्ध सोनं मिळेल. यानुसार संपूर्ण खाणीतून फक्त १६० किलो सोनं मिळू शकेल’, असा दावा जीएसआयचे संचालक डॉ. जीए. एस. तिवारी यांनी केलाय.

सोनभद्रमध्ये सोन्याचा शोध अजून सुरू आहे. जीएसआयचा सर्व्हे अजूनही सुरू आहे. तिथे आणखी सोनं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या जे अशुद्ध सोनं आढळलंय त्यातून १६० किलो शुद्ध सोन निघेल. युएनएफसी मानक असलेल्या जी-३ पातळीवरील तपासाचा अहवाल जीएसआयने उत्तर प्रदेश भूविज्ञान व खाण संचालनालयाला पाठवला आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली.

सोनभद्रच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मागितला अहवाल

सोनभद्रच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून भूमी संबंधी अहवाल मागवण्यात आला आहे. यानंतर ह्या भागावर भू-राजस्व मानचित्र अंकित करून उत्खननासाठी उपयुक्त क्षेत्र असल्याची औपचारिकता पूर्ण केली जाईल. त्यानंतर लिलाव केला जाईल, असं तिवाही म्हणाले. सोनभद्र जिल्ह्यातील सोन आणि हरदी या दोन पहाडीत सापडल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here