मुंबईः मुसळधार पावसामुळं बुधवारी रात्री कसारा घाटात () दरड कोसळली आहे. टिटवाळा ते इगतपुरी दरम्यान कोसळल्यानं रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं नाशिक आणि पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

दरड कोसळल्यामुळं अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. रेल्वे वाहतूक सुरू होईपर्यंत कसारा इगतपुरी येथून एसटीची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाचाः

कसारा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीकडे तातडीने सुमारे शंभर बसेसची मागणी केली होती. एसटीच्या ठाणे विभागातर्फे क्षणाचाही विलंब न करता, १०० गाड्यांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यानुसार २९ बसेस कल्याणसाठी, ४४ बसेस इगतपुरी साठी आणि ३० गाड्या बदलापूरसाठी सोडण्यात आल्या आहेत.

वाचाः
कसारा घाटात दरड कोसळल्यामुळं सीएसएमटी-हैदराबाद स्पेशल, सीएसएमटी-लातूर स्पेशल, सीएसएमटी-वाराणसी सुपरफास्ट स्पेशल, सीएसएमटी-भुवनेश्वर स्पेशल, सीएसएमटी-गडग स्पेशल, सीएसएमटी-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) स्पेशल, सीएसएमटी-हुजूर साहेब नांदेड स्पेशल या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही रेल्वे गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. काही रेल्वे गाड्या दुसऱ्या मार्गांवरून चालवण्यात येणार आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here