आपल्याला एक संतुलन ठेवावं लागेल. मुलं बऱ्याचा कालावधीपासून शाळेत गेलेली नाहीत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पण जी मुलं कम्प्युटर आणि मोबाइल घेऊ शकत नाही, अशांना चांगलं शिक्षण घेता येत नाहीए. यामुळे शाळा सुरू करणं गरजेचं आहे. हे फक्त मुलांच्या शिक्षणासाठी नाही तर त्यांच्या सामाजिक विकासासाठीही गरजेचं आहे. शाळेत मुलं फक्त शिक्षण घेत नाहीत तर समाजात कसं वर्तन करायचं यासह त्यांची सामाजिक जडण घडणही होत असते. शाळा मोठी भूमिका बजावतात. ती ऑनलाइन क्लासेसने भरू निघू शकत नाही, असं डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.
देशात काही भागांमध्ये करोनाचा संसर्गांचे रुग्ण अतिशय कमी आहेत, पॉझिटिव्हिटी दर आणि हॉस्पिटल्समध्ये अतिशय कमी रुग्ण दाखल होत आहेत. यामुळे आपल्याला शाळा टप्प्या टप्प्याने सुरू कराव्या लागतील. ज्या भागात संसर्ग कमी आहे तिथून ही सुरवात करता येऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.
गर्दी कमी करण्यासाठी आपण शाळा पर्यायी मार्गानेही सुरू करू शकतो. एक दिवस काही वर्ग सुरू आणि दुसरे वर्ग बंद. अशा प्रकारे गर्दी कमी होऊन आपल्याला बारकाईने लक्षही ठेवता येईल. पॉझिटिव्हिटी दर कमी राहिला तर मग अशा प्रकारे शाला सुरूच राहतील, असं मत त्यांनी मांडलं.
करोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आणखी अधिक आकड्यांची गरज आहे. डेल्टा प्लस हा डेल्टा वेरियंटपासून तयार झाला आहे. आपल्याकडे जो डेटा त्यावरून हा डेल्टा प्लस वेरियंट किती संसर्गजन्य आहे हे सांगता येत नाहीए. ज्या ठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून येत आहेत तेथील रुग्णसंख्या अचानक वाढलेली नाही. तसंच हॉस्पिटलमध्ये दाखल होत नाहीएत. यामुळे डेल्टा प्लस खूप धोकादायक आहे असं वाटत नाही. तरीही आपण खबरदारी घेतली पाहिजे, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times