जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित ६, अंशत: बाधित ८० अशी एकूण ८६ गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्रात अंशत: १ गाव बाधित आहे. मिरज ग्रामीण मध्ये २ गावे पूर्णत: तर २ गावे अंशत: अशी ४ गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये १५ गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा येथील २ गावे पूर्णत:, २७ गावे अंशत: अशी एकूण २९ गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील १ गाव पूर्णत:, ३ गावे अंशत: अशी एकूण ४ गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यातील अंशत: १३ गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील १ गाव पूर्णत:, १९ गावे अंशत: अशी एकूण २० गावे बाधित आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
स्थलांतरीत व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील २३४ कुटुंबामधील १ हजार ६ व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील ३०७ कुटुंबातील २ हजार २०७ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीण मधील १ हजार ४२४ कुटुंबातील ५ हजार ७४९ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील २ हजार ४५२ कुटुंबातील १४ हजार ७२५ व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील ४२४ कुटुंबातील २ हजार १३५ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील ३९४ कुटुंबातील १ हजार ८४२ व्यक्तींचे , पलूस तालुक्यातील २ हजार ४३६ कुटुंबातील ९ हजार ३२३ व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
यामध्ये जनावरांचे मिरज तालुक्यातील मिरज ग्रामीण क्षेत्रातील १ हजार २१९, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील १ हजार ७४६, वाळवा क्षेत्रातील ३ हजार २६२, अपर आष्टा क्षेत्रातील १ हजार ९०, शिराळा तालुक्यातील २ हजार २२८, पलूस तालुक्यातील ५ हजार २५५ जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील ५ व पलूस तालुक्यातील ३ अशा एकूण ८ जनावरांची जीवितहानी झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times