रात्री उशीरा हाती आलेल्या वृत्तानुसार पाटण तालुक्यातील मिरगाव येथे ढिगाऱ्यांखालून ६ मृतदेह मिळाले आहेत. अजून ४ लोकांचा शोध सुरु आहे.
आंबेघर (ता. पाटण) येथे एनडीआरएफ ची मदतीची कार्यवाही सुरु असून रात्रीपर्यंत ११ मृतदेह मिळाले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
जिल्ह्यातील १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जण स्थलांतरित
सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला असून जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील नागरिकांना पुराचा मोठा धोका आहे. अशा एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील ७२ कुटुंबातील ३९० जण, कराड तालुक्यातील ८७६ कुटुंबातील ३ हजार ८३६ जण, पाटण तालुक्यातील ३२५ कुटुंबातील १ हजार ३०० जण, महाबळेश्वर तालुक्यातील ५१ कुटुंबातील १३० जणांचा समावेश आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सातारा जिल्ह्यातील एकूण १६७ गावे मुसळधार पावसाने पूर्णपणे बाधित झालेली आहे. तर, २१२ गावे अंशत: बाधित झाल्याची माहिती आहे. म्हणजेच सातारा जिल्ह्यातील ३७९ गावांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
साताऱ्यात कोणत्या तालुक्यात किती गावे बाधित?
> वाई तालुक्यातील ४४ गावे पूर्णत: व ७ गावे अंशत: अशी एकूण ५१ गावे बाधित
> कराड तालुक्यातील एकूण ३० गावे अंशत: बाधित
> पाटण तालुक्यातील १० गावे पूर्णत: व ६० गावे अंशत: अशी एकूण ७० गावे बाधित
> महाबळेश्वर तालुक्यातील ११३ गावे पूर्णत: बाधित
> सातारा तालुक्यातील १३ गावे अंशत: बाधित
> जावळी तालुक्यातील १०२ गावे अंशत: बाधित झाली आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times