अगरतळातील हॉटेलमध्ये असलेल्या आय-पॅक टीममधील २३ सदस्यांची चौकशी केली जात आहे. हे एक नियमित चौकशी आहे, असं पश्चिम त्रिपुराचे पोलिस अधीक्षक माणिक दास यांनी सांगितलं.
करोनाचे निर्बंध असतानाही बाहेर फिरत होतेः पोलिस
करोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू आहेत. तरीही जवळपास २३ जण विविध ठिकाणी फिरत होते. यामुळे आम्ही त्यांचं शहरात येण्याची आणि थांबण्याच्या कारणांची माहिती घेण्यासाठी चौकशी केली. यासर्वांची करोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या रिपोर्टची आता प्रतीक्षा आहे, असं माणिक दास म्हणाले.
पोलिसांची ही कारवाई लोकशाहीवर हल्ला करणारी आहे, असं त्रिपुरातील तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशीष लाल सिंह यांनी म्हटलंय. हा लोकशाहीवर हल्ला आहे. त्रिपुराचा निवासी असल्याने या प्रकराने आपण स्तब्ध झालो आहोत. ही त्रिपुराची संस्कृती नाही. त्रिपुरातील भाजप नेतृत्वातील सरकार कुशासनामुळे टीएमसी मिळत असलेल्या मोठ्या समर्थनामुळे घाबरले आहे, अशी टीका त्यांनी केली.
घटनेची माहिती नाहीः भाजप
या घटनेची माहिती तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना देण्यात आली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. तर आपल्याला या घटनेची कुठलीही माहिती नाही, असं त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times