काश्मीरमध्ये दहशतावाद्यांची घुसखोरी झाली. पण सुरक्षा दलांनी राबवलेल्या दहशतवादविरोधी मोहीमांमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. पाककडून शस्रसंधी उल्लंघनेचं प्रमाण वाढल्याने आम्ही आणखी सतर्क झालो आहोत. आम्ही घुसखोरी अनेक प्रयत्न उधळून लावलेत, असं दिलबाग सिंह यांनी सांगितलं.
तरुणांमधील दहशतवादाचं आकर्षण घटलं
आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच मनसुबे उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचं तरुणांमधील आकर्षण कमी झालं आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आधीपासूनच अनेक योजना आखलेल्या आहेत. त्यावर कामही सुरू आहे, असं दिलबाग सिंह म्हणाले.
दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वेळेवर दिल्याने दिलबाग सिंह यांनी नागरिकांचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिक हे सहकार्य कायम ठेवतील. कधी-कधी नागरिक संशयावरून माहिती घेऊन येतात. हे सतर्क नागरिकांचं लक्ष आहे. मिळणाऱ्या माहितीवरून आम्ही कारवाई करतो. यामुळे दहशतवाद्यांविरोधातील आमच्या मोहीमांना यश येतं. दहशतवाद्याविरोधातील मोहीमेचा वेग आणखी वाढवण्यात येणार आहे, असं दिलबाग सिंह यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times