मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांना खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. खासदार राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून प्रकरणावर भाष्य करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. नागरिकांच्या स्वातंत्र्यांचे हनन कोणी केले हे देशाला समजले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर राऊत यांनी या प्रकरणाची चिंता करण्यापेक्षा पेंग्विनची चिंता केली पाहिजे, अशा शब्दात टोला लगावला आहे. (bjp leader gives reply to shiv sena leader and mp )

चित्रा वाघ यांनी खासदार राऊत यांना ट्विट करत हे प्रत्युत्तर दिले आहे. वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, संजय राऊत यांनी पेगॅससची चिंता करण्यापेक्षा ”ची चिंता करावी. आज ज्या युवराच्यांच्या ‘प्रिय’ ठेकेदारामुळे ‘डोरी’चा जीव गेला त्याच हायवे कंस्ट्रक्शन कंपनीला कोविड रुग्णांसाठी प्राणवायू पुरवठ्याचा ठेका दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या याच कंपनीच्या दिरंगाईबाबत आणि गचाळ कारभाराबाबत फक्त ०.५ टक्के दंड आकारला गेला,असे नमूद करतानाच असे का आणि कोणासाठी केले गेले असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

खासदार संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले होते?
संजय राऊत यांनी रोकठोक या सदरातून, तसेच अग्रलेखातून पेगॅससच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारकडे बोट दाखवले आहे. पेगॅसस हे हेरगिरीचे प्रकरण जर सरकारला गंभीर वाटत नाही तर मग हे रहस्यमय असल्याचे वाटते. ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हे देशातील जनतेला जाणून घेण्याचा अधिकार आहे. ‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसले असते, असे राऊत यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here