कोकणातील महाड व चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ते शिरोळ तालुका व कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त जनतेशी संवाद साधणार आहेत. दुसरीकडं, देवेंद्र फडणवीस हे देखील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून करवीर तालुक्यातील पूरग्रस्तांशी संवाद साधणार आहेत.

लाइव्ह अपडेट्स:

  • पद्माराजे विद्यालय शिरोळ येथे पूरग्रस्त निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्तांची मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
  • दोघांनी एकमेकांशी काही क्षण साधला संवाद
  • फडणवीस लक्ष्मीपुरी भागात पाहणी करत असताना शिरोळहून मुख्यमंत्री ठाकरेही पोहोचले त्याच गल्लीत
  • पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकाच गल्लीत
  • फडणवीस यांनी उत्तरेश्वर पेठ, लक्ष्मीपुरी, बापट कॅम्प यासह विविध ठिकाणी भेट देऊन पूरग्रस्तांशी साधला संवाद
  • नरसिंहवाडी हे गाव अजूनही पुराने वेढलेले. गावाबाहेर थांबूनच मुख्यमंत्र्यांनी साधला पूरग्रस्तांशी संवाद
  • ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्र्यांसोबत
  • मुख्यमंत्री ठाकरे यांचा प्रथम नरसिंहवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद

(क्लिक करा आणि वाचा)

  • सरकार पूरग्रस्तांना तातडीने मदत का करत नाही हेच कळत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
  • शिरोळ तालुक्यातील महापुराचा फटका टाळण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
  • सतत पूर येत असल्यामुळे आमचे प्रचंड नुकसान होत आहे, त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा काढा; पूरग्रस्तांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी
  • विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे करवीर तालुक्यातील चिखली या गावातील पूरग्रस्तांची संवाद साधत आहेत
  • मुख्यमंत्री दाखल. शिरोळ तालुक्याच्या दिशेनं रवाना

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here