राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या सहा ते सात हजारांच्या घरात आहे. तसंच, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने खाली घसरत आहे. मात्र, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अजूनही रुग्णवाढीचा दर टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं राज्य शासना सावधगिरीने पावलं उचलत आहेत.
वाचाः
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या घटली असली तरी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कारण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं निर्बंधांबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाहीये, केवळ चर्चा झालीये, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
वाचाः
निर्बंध शिथील करण्याबाबत अंतिम निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री घेणार आहे. देशातील १० राज्यात रुग्णवाढ होत आहे. त्यात महाराष्ट्राचादेखील समावेश आहे. करोना अद्याप संपलेला नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times