आज राज्यात झालेल्या १२० रुग्णांच्या मृत्यूंनंतरही मृत्यूदर मात्र गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख २४ हजार २७८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे.
पाहा, कोणत्या जिल्ह्यात किती सक्रिय रुग्ण!
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७४ हजार ९९५ इतकी आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या किंचितशी वाढताना दिसत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ९७४ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ७ हजार ८६३ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ५१६ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ६ हजार १६० सक्रिय रुग्ण आहेत. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ६ हजार २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ५ हजार ३९३ इतके रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत ५०३६ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ०३६ इतकी आहे. तर, रायगडमध्ये २ हजार ३८९, रत्नागिरीत २ हजार ०२६, सिंधुदुर्गात १ हजार ७०१, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७६१ इतकी झाली आहे. बीडमध्ये १ हजार ७६९, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९२२ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
नंदूरबारमध्ये फक्त १० सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ७७३, नांदेडमध्ये ही संख्या ४४१ इतकी आहे. जळगावमध्ये ३९६, तसेच अमरावतीत ही संख्या ८७ इतकी आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ११९ इतकी झाली आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १० वर आली आहे.
४,४६,५०१ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८९ लाख ६२ हजार १०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ३६ हजार २२० (१२.९४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ४६ हजार ५०१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ७७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times