रामदास आठवले इतक्यावर थांबले नाहीत तर त्यांनी शिवसेनेचं २०२४ मध्ये काय होणार? याचंही भाकित केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये नेहमी भांडण होतं असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. यामुळे शिवसेनेने भाजपसोबत आताही युती करावी असं आवाहन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करतो असं रामदास आठवले म्हटले आहेत. ते अमरावतीमध्ये एका आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतून आणि भाजपमधून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं. रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली. वंचितांकडून मत खाण्याचं राजकारण होत आहे. युती केल्याशिवाय कठीण आहे असंही यावेळी रामदास आठवले म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times