सहकारी चळवळ ही देशाच्या विकासासाठी मोठे क्षेत्र आहे. सहकार हे एक संस्कार आहे आणि एकत्रित चालण्याची मनोवृत्ती आहे. यामुळे सरकारने सहकार क्षेत्रासाठी वेगळे मंत्रालय बनवले आहे. राज्यांतील सहकारला आणखी बळकटी देण्यासाठी हे सहकार मंत्रालय स्थापन केले आहेः पीएम मोदी
२१ व्या शतकात भारत ब्ल्यू इकॉनॉमिकच्या प्रयत्नांना वेग देत आहेः पंतप्रधान मोदी
जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. लडाखमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहे. सिंधु सेंट्रल युनिव्हर्सिटीमुळे लडाख उच्च शिक्षणाचे केंद्र बनणार आहेः पीएम मोदी
लवकरच ईशान्येतील सर्व राज्यांच्या राजधानी रेल्वे मार्गाद्वारे जोडल्या जाती. ईशान्य भारताच्या विकासाठी पर्यटन, अॅडव्हेंचर स्पोर्ट्सला चालना दिली जाईलः पीएम मोदी
देशातील ओबीसी समाजांना आरक्षणाचा अधिकार मिळणार आहे. मागास समाजांना आरक्षणाचा अधिकार देण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झालेः पीएम मोदी
गरीब महिला आणि मुलांमध्ये कुपोषणाने त्यांच्या विकासात मोठा अडथळा येतो. यामुळे गरीबांना पोषणयुक्त तांदळाचा पुरवठा केला जाईलः पीएम मोदी
सरकारच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायच्या आहेत. उज्ज्वला, आवास आणि आयुषमान भारत, या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचतील यासाठी काम करायचं आहेः पीएम मोदी
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेतः पीएम मोदी
हा फक्त ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याचा समारंभ नाही तर आता परिश्रमांची पराकाष्टा करण्याची वेळ आहे. देशाच्या विकासासाठी आपल्याला काम करायचं आहेः पीएम मोदी
आपल्याला असा आधुनिक भारत बनवायचा आहे जिथे सर्व नागरिकांना अत्याधुनिक सुविधा असतीलः पीएम मोदी
आपल्याला पुढील २५ वर्षांत समृद्धीचे नवीन शिखर गाठायचे आहे. अशा विकासाचे निर्माण करायचे आहे, जिथे शहर आणि ग्रामीण असा भेद राहणार नाहीः पीएम मोदी
देशाच्या विकासासाठी ७५ वर्षांच्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने आपल्या नवीन संकल्प सोडावे लागतील. कोणत्याही क्षेत्रात भारत मागे राहू नये, यासाठी संकल्प करूयाः पीएम मोदी
करोनाच्या संकटात अनेक मुलं अनाथ झाली. त्यांनी आपल्या पालकांना गमवलं. हे अतिशय वेदनादायी आहेः पीएम मोदी
पोलिओची लस मिळवण्यासाठी देशाला अनेक वर्षे लागली. पण करोना लसीसाठी आपल्याला कुणावर अवलंबून राहण्याची वेळ आली नाहीः पीएम
करोनाचे संकटाचा भारतीयांनी संयमाने आणि धैर्याने सामना केला आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी भारताला लस विकसित करून दिली. आज आपल्याला लसीसाठी कुणावर अवलंबून रहावं लागलं नाहीः पीएम मोदी
ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या आणि पदक विजेत्या खेळाडूंचा टाळ्या वाजवून पंतप्रधान मोदींनी केला गौरव
नैसर्गिक आपत्तीमुळे आणि पूर आणि पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण देश या बिकट स्थितीत या राज्यांसोबत आहेः पीएम मोदी
करोनाच्या महामारीत वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, लस विकसित करणारे शास्त्रज्ञ आणि देशातील जनतेने संकटाचा सामना केला. करोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या योद्ध्यांचे विशेष आभारः पीएम मोदी
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या दिनानिमित्त देश स्वातंत्र्यवीरांना आणि क्रांतिकारकांचे स्मरण करत आहे. १४ ऑगस्ट हा फाळणी स्मृती दिन असेलः PM मोदी
पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर केले ध्वजारोहण
पंतप्रधान मोदींना लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर…
…. यानंतर पंतप्रधान मोदी हे लाल किल्ल्यावर दाखल झाले
लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times