भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट करत अनिल देशमुखांवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात. ‘महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना ईडीचे समन्स चुकावल्यास अटक होणार का? ही चर्चा महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः
‘सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्यानंतर माजी गृहमंत्र्यांनी सरकारी यंत्रणांना सहकार्य करणे नितिमत्तेला धरुन होईल. थोडी तरी लाज बाळगा,’ अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, गृहमंत्री या नात्याने देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपानुसार ‘ईडी’ने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यामध्ये देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक, यांना अटक करण्यात आली आहे. तसेच देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची सुमारे साडे चार कोटी रुपयांची मालमत्तादेखील जप्त करण्यात आली. त्यामुळे ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना चार वेळा समन्स बजावला होता. दरवेळेस त्यांनी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने हा समन्स चुकवला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायलायाने अनिल देशमुख यांना कुठलाही अंतरिम दिलासा देण्यास सोमवारी नकार दिला.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times