पंढरपूर: दिल्ली हिंसाचावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी थेट काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस आणि काँग्रेसचे सहयोगी पक्ष जबाबदार असून काँग्रेसनेच दिल्ली पेटवली आहे, असा गंभीर आरोप आठवले यांनी केला.

दिल्लीत सध्या हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या हिंसाचारात अनेकांचे जीव गेले आहेत. या साऱ्या प्रकाराला काँग्रेस जबाबदार आहे, असे रामदास आठवले म्हणाले. अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना दिल्लीत हिंसाचाराच्या घटना घडत असतील तर त्यामागे कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी अपेक्षाही अठवले यांनी व्यक्त केली. रामदास आठवले आज पंढरपुरात संत मेळाव्यासासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना तांनी काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

मी ट्रम्प यांच्या पक्षाचा अध्यक्ष!

कोल्हापुरात बोलताना आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावरून आपल्या खास शैलीत मिश्किल अशी टोलेबाजी केली. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि मी त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष आहे. म्हणूच ट्रम्प यांचे भारतात स्वागत आहे, असे आठवले म्हणाले.

हे सरकार टिकणार नाही

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आठवले यांनी यावेळी टीका केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे ते म्हणाले. भाजपचे नेते नारायण राणे यांनी आठ दिवसात महाविकास आघाडी सरकार पडेल, असा दावा केला आहे. राणे यांच्यासारखा नेता असे विधान करत असेल तर निश्चितच तशा काही हालचाली सुरू असतील, असेही आठवले म्हणाले. शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रमानंतर आठवले माध्यमांशी बोलत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here