रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुरुड समुद्र किनाऱ्यावरील बंगल्यांच्या बांधकामाला भाजपनं तीव्र आक्षेप घेतला आहे. ही बांधकामं बेकायदा असून ती ताबडतोब पाडण्याचे आदेश द्यावेत व या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे.

भाजपचे माजी खासदार यांनी आज मुरुड गावात जाऊन संबंधित बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर सोमय्या यांनी उपविभागीय अधिकारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांना एक पत्रही दिलं. नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड ३ मध्ये येते. या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नार्वेकर यांनी घेतलेली नाही, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. ‘मुख्यमंत्री कार्यालयाचा जबरदस्त दबाव असल्यामुळं रत्नागिरी जिल्हा प्रशासन या अनैतिक काम करणाऱ्या राजकीय नेत्यांची पाठराखण करत आहे,’ असा आरोपही त्यांनी केला आहे.

वाचा:

‘यापूर्वी जून महिन्यात मी मुरुड गावात जाऊन संबंधित बांधकामाची माहिती घेतली होती. त्यानंतर ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार केली. जिल्हाधिकारी, जिल्हा सागरी किनारा व्यवस्थापन समिती, महाराष्ट्र सागरी किनारा झोन व्यवस्थापन प्राधिकरण व पर्यावरण खात्याकडंही तक्रारी केल्या होत्या. मात्र, ग्रामपंचायत, तहसीलदार वा जिल्हाधिकारी कोणीही आजपर्यंत काहीही कारवाई केलेली नाही. आतातरी हे बांधकाम तोडावं, अशी आग्रही मागणी सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे. सोमय्या यांनी या संबंधीचा एक व्हिडिओ देखील ट्विटरवर शेअर केला आहे.

लोकायुक्तांकडं याबाबत दावा दाखल करण्यात आला असून सुनावणी सुरू झाली आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडं देखील या प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणातील आणखी पुरावे मी लवादापुढं सादर करणार आहे,’ असं सोमय्या यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here