निधीची कमतरता भासू देणार नाही
तळोद्यातील आदिवासी विकास भवनात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. पवार यांनी राज्याच्या आरोग्य विभागावर ताशेरे ओढले. नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी विभागात राज्याच्या आरोग्य विभागाच्या योजना फक्त कागदोपत्रीच दिसून येतात. राज्य सरकारने याकडे तत्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
आशा भगिनींचे केले कौतुक
जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मालेगावात आशा वर्कर्ससाठी आयोजीत केलेल्या संवाद कार्यक्रमात डॉ. पवार यांनी सहभाग नोंदवल. यावेळी डॉ. पवार यांनी आशा भगिनींचे कौतुक केले. करोनाच्या संकट काळात ग्रामीण आणि निमशहरी भागातील बालकांच्या, तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशा भगिनींनी मोठे योगदान दिले आहे. त्याच्या कामगिरीचा अभिमान वाटतो, असे त्या म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
करोनावर मात करायची असेल तर गावागावात जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगत वेळोवेळी तपासणी करणे देखील गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. गाव पातळीवर ही जबाबदारी आशा भगिंनींनी सांभाळली. त्यांचे हे योगदान कौतुक करण्याजोगे आहे, असे त्या म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान डॉ. भारती पवार यांनी जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी माजी वनमंत्री स्वर्गीय दिलवरसिंग पाडवी यांच्या समाधीस्थळी भेट दिली. खापर, अक्कलकुवा असा प्रवास करत त्यांनी गुजरात राज्यातील देवमोगरा देवीचे दर्शन घेतले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times