काबुलसाठी एअर इंडियाच्या विमानांची उड्डाणं करणं अवघड झालं आहे. यामुळे हवाई दलाला स्टँड बायवर ठेवण्यात आलं आहे. जवळपास ४०० हून अधिक भारतीयांना बाहेर काढण्याची गरज पडू शकते, असा अंदाज आहे. पण अजूनही अचूक आकडेवारी समोर आलेली नाही. तसंच गृहमंत्रालय अफगाण नागरिकांच्या व्हिसा अर्जांचाही विचार करत आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
भारतीय हवाई दलाच्या दोन C-17 या विमानांनी १५ ऑगस्टला भारतीय दुतावास कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी उड्डाण केले होते. भारतीय दुतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या आयटीबीपीच्या जवानांनाही आणण्यात येणार होतं. पण काबुल विमानतळावर गोंधळाच्या परिस्थितीमुळे एकाच विमानचं उड्डाण होऊ शकलं. पण नंतर भारतीय हवाई दलाच्या C-17 या दुसऱ्या विमानाद्वारे भारतीय दुतावासातील १२० कर्मचारी आणि राजदूत रुद्रेंद्र टंडन यांच्यासह आयटीबीपीच्या जवानांना मायदेशात आणण्यात आलं. हे विमान मंगळवारी सकाळी सुरक्षित अफगाण हवाई हद्दीतून बाहेर पडून गुजरातच्या जामनगर विमानतळावर उतरलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times