सोलापुरातील या पाच तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्यानं जिल्हा प्रशासनाने १३ ऑगस्टपासून कठोर निर्बंध लागू केले होते. त्यानंतर १० दिवसांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या तालुक्यातील सर्व दुकानं दुपारी ४ पर्यंत सुरू राहणार आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
वाचाः
अत्यावश्यक सेवांची दुकाने ७ दिवस उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुपारी चार पर्यंत दुकानं सुरू राहणार आहे. तर, लग्नासाठी ५० जणांना तर, अंत्यसंस्कारांसाठी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
वाचाः
हॉटेल चालक व रेस्टॉरंटसाठी ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. मात्र, पाच दिवसच हॉटेल व रेस्टॉरंट सुरू राहणार आहेत. सर्व खासगी कार्यालय उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. सामाजिक आणि राजकीय मेळाव्यांना ५० टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times