आज सकाळपासूनच भगवती मैदानावर मनसेनं दहीहंडी उत्सवासाठी तयारी सुरू केली होती. या मैदानात स्टेज उभारण्यात येत होता. मात्र पोलिसांनी सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांनी अविनाश जाधव यांच्यासहीत पदधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, साजरी करण्यासंदर्भात ठाम असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. नियम पाळून हा उत्सव साजरा करणार असल्याची घोषणा मनसेनं केली आहे.
अविनाश जाधव यांची सरकारची टीका
दरम्यान, पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यापूर्वी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालतं. काल नारायण राणे कुडाळमध्ये पोहोचले तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर शे- दीडशे लोक होते ते चालतं. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर करोनाचे कारण दिलं जातं. याचं राजकारण करताना करोना आडवा येत नाही, असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times