खासदार राऊत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. केरळमध्ये काय चालले आहे आपण पाहत आहोत. केरळमध्ये करोनाची तिसरी लाट सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी उघडल्या जात आहेत. पण काही राजकीय पक्ष ज्यांना जनतेमध्ये बेस नाही ते अशा प्रकारे वागत आहेत, असा टोला राऊत यांनी मनसेला लगावला.
क्लिक करा आणि वाचा-
ते पुढे म्हणाले, बरं हे बंधन कोणी घातले आहे?, हे बंधन केंद्र सरकारने आणले आहे. केंद्र सरकारने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की दहीहंडी आणि गणेशोत्सव याबाबत राज्याच्या सरकारने काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र आहे. पण हे आमच्या लोकांना कळत नसेल तर आम्ही त्याला काय करणार?
क्लिक करा आणि वाचा-
‘आम्ही कारवाई केली तर म्हणतील हिंदुत्वविरोधी आहेत’
अशा लोकांवर केंद्र सरकार कारवाई करेल का? जर आम्ही कारवाई केली तर म्हणतील की आम्ही हिंदुत्ववादविरोधी आहोत. मात्र अॅडव्हायझरी केंद्र सरकारची आहे, गृहमंत्रालयाची आहे, अमित शहा यांची आहे. मग काय केंद्र सरकारला हिंदुत्ववादविरोधी म्हणणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times