अधिक माहितीनुसार, सुभाष राठोड हे काही वर्षापुर्वी पत्नीपासून विभक्त झाले. मात्र त्यांनी मुलगी स्वतःजवळ ठेवली. सुभाष राठोडने दुसरं लग्न केलं. मुलगी वयात येत असल्याचे लक्षात येताच सावत्र आईची नियत फिरली आणि तीने पती, दोन मुलांच्या मदतीने १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला २०१९ मध्ये राजस्थानमध्ये भावना चावला या महिला एजंटच्या मदतीने विक्री केली.
मुलीला गुंगीचे औषध देऊन दोन पुरुषांनी तिथे वारंवार बलात्कार केला. यात पिडीता गर्भवती राहिल्याने तीला वडीलांच्या स्वाधीन केले. २०२० मध्ये सुभाष राठोड हा औरंगाबादला वास्तव्यास होता. या कालावधीत पित्याने नंदुरबारच्या संदिप माळीला मुलीला दोन लाखात विकले. माळीने आठ महिने पिडीतेचे शोषण करून पुन्हा सुभाष राठोडकडे आणून सोडले. सुभाष राठोड एवढ्यावरच थांबला नाही.
पत्नीच्या पैश्याच्या हव्यासापोटी त्याने मुलीला तिसऱ्यांदा सातारा येथील विठ्ठल गायकवाडला दोन लाखात विकले. गायकवाडने लग्नाचा बनाव करुन तिचा शारिरीक मानसिक छळ करत वारंवार बलात्कार केला. गायकवाडच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन हदगाव येथे मावशीचं घर गाठून मावशीला आपबिती सांगितली आणि मावशीच्या मदतीने पिडीत मुलीने हदगाव पोलीस ठाण्यात सुभाष राठोड, सावत्र आई, दोन भाऊ आणि अत्याचार करणाऱ्या राजस्थान, सातारा आणि नंदुरबारच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस या घटनेचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times