कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील कुरवळ, निरकरवाडी येथे शेतात तुटून पडलेल्या विजेच्या तारेचाचा स्पर्श होऊन इंदिराबाई विठोबा लाड वय ८० या आजींचा मृत्यू झाला. याची मुलगा संतोष लाड यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे.
इंदिराबाई या आपल्या शेतातून जात असता शेतात असलेल्या पोलवरील तारा खाली तुटून पडल्या होत्या. त्यातून विद्युत प्रवाह चालू होता. तेथून जात असताना इंदिराबाई यांना प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या जोरदार धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
हा सगळा प्रकार लक्षात येईपर्यंत आजींचा मृत्यू झाला होता. हा धक्कादायक व दुर्दैवी प्रकार काल मंगळवारी दुपारच्या सुमारास घडल्याची माहिती बुधवारी खेड पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times