आज राज्यात झालेल्या ५५ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८१ हजार ९८५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या किंचित घटली
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ६०७ वर आली आहे. काल ही संख्या ५१ हजार ०७८ वर होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा वाढून तो १४ हजार ६६० वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या कमी होत ती ६ हजार ८९८ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ६८४ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ९२८ वर घसरली आहे. तर, सांगलीत एकूण ३ हजार ७७८ इतकी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ९४७ वर खाली आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत उपचार घेत आहेत ३,७५६ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ३ हजार ७५६ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०९२, सिंधुदुर्गात ९४१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७१४ इतकी आहे.
नंदूरबार, गोंदिया जिल्ह्यात फक्त दोन सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५८५, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ८२ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या १०१ वर आली आहे. राज्यात नंदुरबार आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्ण असून हीच राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
क्लिक करा आणि वाचा-
२,८७,३८५ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४३ लाख २७ हजार ४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७३ हजार ६७४ (११.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८७ हजार ३८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ९७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times