मुंबई: ‘तरुणांच्या हाताला काम हवं आहे, पण भाजपनं बेरोजगारांच्या हाती घंटा दिल्या आहेत. घंटा वाजवून मंदिरं उघडण्याची मागणी करीत रहा, असं बजावलं आहे. घंटा बडवून बेरोजगारीचा राक्षस मारला जाणार असेल तर देशाच्या उद्योग मंत्रालयानं एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या दारात आता घंटा लावून रोजगारनिर्मितीचे दालन उघडायला हवं,’ अशी जहरी टीका शिवसेनेनं केली आहे. (Shiv Sena Slams Modi Government over Unemployment)

मागील महिन्यात देशातील १६ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दाखवलेल्या ‘अच्छे दिन’चं विदारक चित्र समोर आलं आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी देशाच्या ‘जीडीपी’चं गुलाबी चित्र दोन दिवसांपूर्वीच रेखाटलं. त्या गुलाबाचे काटे आता टोचू लागले आहेत व पाकळ्या झडू लागल्या आहेत. मोदी सरकारनं जी बेजबाबदार नोटाबंदी देशावर लादली, त्या नोटाबंदीनं कोसळलेल्या अर्थव्यवस्थेखालीच दोनेक कोटी रोजगार चिरडला गेला. नोटाबंदी हे अर्थव्यवस्थेवरचं भयंकर संकट होतं व त्यातून दोन कोटींवर लोकांनी कायमच्या नोकऱ्या गमावल्या. त्यानंतर करोना व लॉकडाऊन आले. या काळातही तितक्याच लोकांनी रोजगार गमावला. व्यापार, उद्योग-व्यवसायांना टाळं लागलं, पण ज्यांनी या काळात रोजगार गमावला, जे बेकार झाले त्यांची काय व्यवस्था केली?,’ असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

वाचा:

‘देशात मोठे उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रातच आहेत. यातले बरेचसे उद्योग विकून सरकार सहा लाख कोटी रुपये जमा करणार आहे. त्यातून अर्थव्यवस्थेला जीवदान मिळेल, पण लोकांना नोकऱ्या मिळतील काय? शिवाय रस्ते, रेल्वे स्टेशन्स, विमानतळ खासगी उद्योजकांना भाड्यानं देऊन सरकार पैसे कमावण्याच्या नादात आहे. म्हणजे देशाची संपत्ती भाड्यानं देऊन त्यावर मजा मारण्याची योजना आहे,’ असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

‘महाराष्ट्रासारख्या राज्यात ‘एसटी’ कर्मचाऱ्यांचे पगार रखडले म्हणून राज्य सरकारनं एसटी महामंडळाला ५०० कोटी रुपये दिले. अशी परिस्थिती देशभरातील अनेक सरकारी उपक्रम, आस्थापनांच्या बाबतीत आहे. जुनं भंगारात काढलं जात आहे, विकलं जात आहे, पण नव्या उद्योगांत गुंतवणुकीच्या नावानं बोंब आहे. स्टार्ट-अप इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या उपक्रमांची चांगलीच प्रसिद्धी झाली, पण रोजगाराचा प्रश्न काय आहे,’ अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

वाचा:

मोदींचे सरकार हे जगातले एकमेव उत्तम सरकार असल्याचे अंध भक्तांचे म्हणणे आहे. अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला व मंदिरांच्या नावाने राजकीय घंटा बडवायला काहीच हरकत नाही, पण लाखो लोकांनी रोजगार गमावला आहे आणि त्यातून जे आर्थिक अराजक निर्माण झाले आहे, त्याचे काय? या संकटाचा सामना केंद्र सरकार कसा करणार आहे? नोकऱ्यांचे काय करणार? घंटा बडवून बेरोजगारी हटणार असेल तर तसं स्पष्ट करा,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here